Dr. Bhimrao Ambedkar Information in Marathi Language | डॉ. भीमराव आंबेडकर

Dr. Bhimrao Ambedkar Information in Marathi Language डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता, जातीतील भेदभाव नष्ट व्हावे म्हणून अहोरात्र श्रम केले. त्यांचा हा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. या थोर महापुरुषाचा आपण आजही तेवढाच आदर करतो. त्यांनी दलितांना त्यांचे हक्क मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती पाहू.

जन्म

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल, 1891 मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भिमाबाई असे होते. रामजी व भिमाबाई यांना 1891 पर्यंत 14 अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या व मुलांपैकी बळीराम, आनंदराव व भीमराव ही तीन मुले जगले. भिमराव हे सर्वात लहान चौदावे अपत्य होते. आंबेडकर यांच्या आजोबांचे नाव मालोजी सपकाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ लागले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजी यांच्या घरातील व्यवहारात शुध्द विचाराला आणि शुध्द आचाराला महत्त्वाचे स्थान होते.

मालोजीना तीन मुल व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुला नंतर मीराबाई या मुलीचा जन्म झाला होता. 1848 च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीरावांचे चौथ्या अपत्त होते. रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी वाचत असत. सकाळी स्तोत्रे व भोपाळ या हेमंत सैन्यात शिपाई असताना, सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरू झाले व त्याने इंग्रजी भाषा उत्तम रित्या आत्मसात केले. त्यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुटली होती. त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.

बालपण

रामजी ज्या पलटणीत होते. ती पलटण 1888 मध्ये मध्यप्रदेश मधील मोहोळ येथील लष्करी तळावर आली होती. तेथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला होता. त्यांचे लहानपणीचे नाव भिवा असे होते. त्यांची भीम, भीमा आणि भीमराव ही नावे ही प्रचलित आहेत. आंबेडकर यांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते.

अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.
1894 मध्ये सुभेदार रामजी सपकाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवर निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्ती परिवारासह राहू लागले. वय लहान असल्यामुळे भीमरावांना शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही. नंतर 1896 च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. या वर्षी त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यानंतर काही दिवसांनी भीमा आईचे निधन झाले. त्यावेळी आंबेडकर पाच वर्षांचे होते. त्यानंतर भीमासह अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाई यांनी कठीण परिस्थितीत केले.

शिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1904 मध्ये मुंबईमध्ये आल्यावर एलफिन्स्टन या सरकारी शाळेत जाऊ लागले. एलफिस्टन हायस्कूलमध्ये जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. दहावीनंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी पूर्ण केली. तसेच बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले. आंबेडकर परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट म्हणजे पी.एचडी पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. आंबेडकर हे त्यांच्या घरातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते. त्यांनी नोव्हेंबर 1896 ते नोव्हेंबर 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि चीन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले.

जीवन

आंबेडकर हे त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत एक अर्थ शास्त्रज्ञ प्राध्यापक आणि वकील होते त्यानंतर त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार माध्यमे व चर्चा माध्यम यांच्या मध्ये सामील झाले वृत्तपत्र प्रकाशित केले. दलितांसाठी राजकीय हक्काचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला तसेच आधुनिक भारताची निर्मिती त्यांचे मोलाचे योगदान आहे. भीमराव शाळेत असतानाच 1906 मध्ये चौदा पंधरा वर्षाचे असताना, भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची 9-10 वर्षीय कन्या रमीबाई उर्फ रमाबाई यांचीशी झाले. एलफिस्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील उच्च जातीच्या मुलापासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत. आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज अठरा तास अभ्यास करत असत.

आंबेडकरांचे कार्य

भारताचे संविधान तयार करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कृषी व शेतकऱ्यांसाठी त्यांनी समाजव्यवस्थेशी शेतीचा व्यवसाय जोडला. ग्रामीण भागातील जातींवर आधारित समाजव्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शोधले होते. त्यामुळे जातीवर आधारित समाज व्यवस्था बदलायची तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानले पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक वृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकांना आर्थिक क्षमतेचा फायदा होईल आणि आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते, म्हणून आर्थिक विषमता जितके कमी होईल तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल असे त्यांना वाटत होते.

शेतीसाठी पाणी व जमीन मुख्य घटक आहे. पाण्याशिवाय शेतीचा विकास करणे अशक्य आहे. शेतकऱ्याला स्वच्छ पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याची उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही. हे त्यांनी ब्रिटिश सरकारचे निर्देश आणून दिले. शेतकऱ्यांसाठी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पहिला संप घडवून आणला होता. हा संप 1928 ते 34 या कालावधीत झरी या गावात झाला. हा संप व सात वर्षे सुरू होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी संघर्ष केले.

बाबासाहेबांनी राजकीय कार्य केलेले आहे. त्यामध्ये डिसेंबर 1926 मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषण दिले. 1936 पर्यंत मुंबई विधान परिषदेचे सदस्य होते. अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्यांना 1930 मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचे प्रतिनीधी म्हणून आमंत्रण दिले गेले.

आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय भाग घेतला पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लीम लीगच्या लाहोर ठरावाच्या 1940 नंतर आंबेडकर यांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या नावाने 420 पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी पाकिस्तान या संकल्पनेची विश्लेषण केले. त्यांनी मुस्लीम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागण्या वर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला आहे.
बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ञ अर्थतज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कासाठी आंदोलन केले सामाजिक भेदभाव व विरुद्ध लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं कष्टकरी शेतकरी आणि महिलांच्या अधिकारांसाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदे मंत्री म्हणून काम केले.

Babasaheb Ambedkar information in Marathi language. डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment