संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi

संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi: संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक होते. ते महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी होते. भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञ प्रवर्तक. अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला. त्यांनी योगसामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले. आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माउली झाले. आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माउलीच्या नावाचा गजर करत नामसंकीर्तनात दंग होऊन पंढपूरला जातात.

नक्की वाचा – माझे शेजारी मराठी निबंध

Sant Dnyaneshwar Information in Marathi

संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi

ज्ञानेश्वरांचे जन्म आणि कुटुंब (Birth and Family of Sant Dnyaneshwar)

तेराव्या शतकात आपेगाव येथे, श्रावण कृष्ण अष्टमी, शके 1197 (इ.स 1275) रोजी (Sant Dnyaneshwar born on) ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. विठ्ठलपंत कुलकर्णी (father of Sant Dnyaneshwar) हे त्यांचे वडिल तर रुक्मिणीबाई (mother of Sant Dnyaneshwar) हे आईचे नाव होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव (Birth place of Sant Dnyaneshwar) हे त्यांचे जन्मगाव, पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते. विठ्ठलपंत ते नंतर गाव लेखापाल होते. ते मुळात विरक्त्त संन्यासी होते. त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले. ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले. म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले. विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला.

विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे.(Siblings of Sant Dnyaneshwar) लहान वयातच वडिलांकडून चारही भावडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले. त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले.

संत ज्ञानेश्वरांचे बालपण(Early life of Sant Dnyaneshwar Maharaj)

एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्याकाळी समाजाला मान्य नव्हतं. त्यामुळे आळंदीच्या शास्री-पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. विठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायश्चित करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती त्यांनी केली; परंतु ब्राह्मणांमधील रूढीवादी घटक एका इंचाची घसरण करण्यास आणि धागा समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते – शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की, जर विठ्ठलपंतने केलेल्या महान पापापासून मुक्त झाले असेल तर, त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगा आणि यमुना परिषदेत आपल्या प्राणाची आहुती दिली पाहिजे.

विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एक झोपडी बांधून राहू लागले. विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले. वाटेत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना निवृत्ती आणि त्यांची चुकामूक झाली. निवृत्ती सात दिवस गहिनीनाथांच्या गुहेत राहिले. पुढे भावंडांची भेट झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळालेलं सर्व ज्ञान ज्ञानेश्वरांना दिले. त्याचवेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्ती नाथांना गुरू केले.

संन्याशाची मुले असे म्हणून त्यांच्याच समाजातील लोक अतिशय निष्ठूरपणे त्यांची हेटाळणी करीत असत. त्यांची केलेली विटंबना, उपेक्षा, हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे. त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जलसमाधी घेतली. त्यांना वाटले, आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मणसमाजात स्थान मिळेल; परंतु तसे घडले नाही.

आपल्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने दोन लहान भाऊ व बहिणीचे सांत्वन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवाईकांकडून कमीतकमी आधार मिळावा म्हणून आपेगावला गेले; परंतु विठलपंत यांच्या अनुपस्थितीत आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी या बेघर आणि निर्जन अनाथांसाठी दरवाजे बंद केले.

त्यानंतर ही भावंडे परत आळंदीला गेली तिथे गेल्यावर समाज त्यांचा स्वीकार करेल असे वाटले होते; परंतु असे झाले नाही. उलट त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टीही नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठणला गेली. तिथे ब्रह्मसभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धिपत्र मिळाले नाही.

नक्की वाचा – बातमी मराठी 

संत ज्ञानेश्वरांचे चमत्कार (Miracles by Sant Dnyaneshwar)

संन्याशाची मुले म्हणून कुत्सित नजरेने लोक त्यांच्याकडे पाहू लागले. तुमच्या मुंजीस धर्मशासाची परवानगी नाही असे शेवटी त्यांना सांगण्यात आले. धर्माचे ठेकेदार पुढे असेही म्हणाले की, “ब्रह्मचर्याचे आचरण करा, संसार वाढवू नका, परमेश्वराची भक्ती करा. यामुळे तुमचे पाप नाहीसे होऊन मुक्ती मिळेल.” ब्रह्मसभेची आज्ञा त्यांनी निमूटपणे मान्य केली.

तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकाने नाव विचारले. ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले, “ज्ञानदेव.” त्यावर “नावात काय आहे ? तो समोरून रेडा येत आहे, त्याचेही नाव ज्ञाना आहे; परंतु पखाली वाहण्याचं काम करतो.” असे बाजूला असलेला एक ब्राह्मण कुचेष्टेने म्हणाला, यावर शांतपणे ज्ञानदेव म्हणाले, “हो” पण त्याच अन् माझा आत्मा एकच आहे. हो का ? म्हणतोस आहेस तर तू या रेड्याच्या तोंडून वेद बोलवून दाखव. मग आम्ही तुझं म्हणणं मान्य करू.” ज्ञानोबा रेड्याच्या जवळ गेले आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याबरोबरच रेड्याच्या तोंडून भराभर वेदातील ऋचा बाहेर पडू लागल्या. कित्येक लोकांनी हा चमत्कार पाहिला. तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.

एक चमत्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर नेवासे येथे गेले आणि  तेथे आणखी एक चमत्कार त्यांची वाट पाहत होता. नेवासेचा उल्लेख ज्ञानेश्वरीत सापडतो, जिथे हे उत्तम पुस्तक लिहिले गेले होते. ही मुले नेवासेमध्ये प्रवेश करीत असताना त्यांना आढळले की एक माणूस मृत अवस्थेत होता आणि त्याची पत्नी त्याच्या मृतदेहाच्या शेजारी ओरडत होती. ज्ञानेश्वरांनी त्या व्यक्तीचे नाव काय आहे हे विचारले आणि ते सच्चीतानंद असल्याचे सांगण्यात आल्यावर ते म्हणाले की ते नाव धारण करणारी व्यक्ती कधीही निर्जीव असू शकत नाही. म्हणूनच त्यांनी त्या निर्जीव शरीरावर आपल्या अमृत हाताने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला उठण्यास सांगितले, आणि सच्चीतानंद उठले. याच सच्चीतानंदाने नंतर ज्ञानेश्वरीचे लेखक म्हणून काम केले, जेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या उत्तम पुस्तकांची रचना केली.

संत ज्ञानेश्वरांचे आध्यात्मिक कार्य (Spiritual Work of Sant Dnyaneshwar)

तो भाग्याचा दिवस उजाडला, जेव्हा पैठणवरून आळंदीला जाताना ही भावंडे नेवाशाला थांबली. मुळातच दैवी प्रतिभेचे देणे लाभलेल्या ज्ञानेश्वरांच्या हातून गीतेचा प्राकृत भाषेत अनुवाद असलेला ‘भावार्थ दीपिका’ (Bhavarth Deepika) हा ग्रंथ तिथेच लिहिली गेली. किती कल्पनांचा, उपमांचा, अलंकारांचा वापर त्यांनी केला आहे! ती वाचताना माणूस मंत्रमुग्ध होतो. त्यांचं साहित्य म्हणजे आत्मानुभवाचा सागरच आहे. तत्कालीन अस्तित्त्वात असलेल्या सर्व तात्विक पुस्तकांचे ज्ञान, जीवनाचे वेगवेगळे सिद्धांत, त्याच्या काळातील लोकांच्या प्रथा व शिष्टाचाराचे ज्ञान आणि पुस्तकातून स्पष्ट झालेल्या अशा सर्व गोष्टी वाचकांना आश्चर्यचकित करतात.

Visit our Blog

खूप प्राचीन काळापासून विश्वाच्या रहस्याचा शोध विज्ञानाने घेतला. अध्यात्माने आत्मसात केला तो असा, ज्या पंचमहाभूतांपासून ही जीवसृष्टी निर्माण झाली, त्याच पंचमहाभूतांपासून माणूस निर्माण झाला. जी शक्ती पंचमहाभूतांच्या ठिकाणी आहे, तीच शक्ती माणसांच्या ठिकाणीही आहे.

‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ हे मान्य करून या विश्वातील मानवाचं स्थान काय आहे? ती शक्ती कुठे आहे? याचा शोध कसा घ्यायचा त्यासाठी जप, तप, ध्यान-धारणा ही तंत्रं शोधून काढली. या तंत्राचा वापर केल्यानंतर लक्षात आलं की, जर या शक्तीचा वापर केला तर माणसाच्या मूळस्वरूपाचं रहस्य मिळू शकतं. यावर विचार करून आत्मशोधाला सुरूवात झाली.

आत्मिकशक्तीचा वापर करून ‘असाध्य ते साध्य करण्याचे सामर्थ्य माणसामध्ये आहे हे ज्ञानेश्वरांनी केलेल्या अनेक चमत्कारावरून लक्षात येते. कधी रेड्याच्या तोंडून श्लोक बोलवून घेतले, कधी पाठीवर मांडे भाजवले, तर कधी भिंत चालवली. विज्ञानाचा आणि अध्यात्माचा उद्देश एकच, तो म्हणजे मानवाचे कल्याण. ज्ञानाच्या मार्गाने जीवन सुखी करणे. “जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति” याचा प्रत्यय ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक प्रवासातून सर्व संतांनी व सामान्यांनी अनुभवला.

भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) (Dnyaneshwari), अमृतानुभव (Amrutanubhav), चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग अशा विश्वकल्याण करणाऱ्या साहित्याची (काव्याची) निर्मिती केली. सर्वसामान्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत रचना करून अध्यात्माचे ज्ञानामृत समाजाला दिले. संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत ‘भावार्थदीपिका’ हा ग्रंथ लिहिला, तोही वयाच्या सोळाव्या वर्षी. खरंतर हा चमत्कार वाटावा असे असंभव कार्य त्यांनी केले. त्यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता होतीच, वेद, पुराणं, गीता याचे ज्ञान त्या चारही भावडांना बालवयातच वडिलांनी दिले.

ज्ञानेश्वरांनी पसायदान (Pasaydan) लिहिले जे लोकांच्या सामान्य आरोग्यासाठी प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानचा समावेश आहे. भागवत धर्म हा सर्वांसाठी समान आहे असे सांगितले. सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत. वारकरी संप्रदायाचा जो आचारधर्म आहे, तो कोणीही आचरणात आणून ईश्वरप्राप्ती करू शकतो, अशा साध्या सोप्या शब्दांत त्यांनी रंजल्या गांजल्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.

बुद्धीच्या पलीकडे जाऊन मनाला जागवण्याचं काम अध्यात्माद्वारे होते. अध्यात्म म्हणजे माणसाच्या अंतर्जगातला शोध होय. या शोधातच चैतन्याचे सरोवर मिळते. ते चैतन्य म्हणजे परमेश्वर; ही जाणीव जेव्हा होते, तेव्हा जगण्याची परिभाषाच बदलते. संत ज्ञानदेवांना जी विश्वरूपाची अनुभूती आली, ती त्यांनी विश्वकल्याणासाठी वापरली. ईश्वराला प्रार्थना करून पसायदानाची निर्मिती केली.

हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरांनी 27 अभंगांमध्ये हरिभक्तीची श्रेष्ठत सांगितली आहे. हरीचं नामस्मरण करण्यासाठी ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र सांगितला. जर या मंत्राचे उच्चारण केले तर अनंत जन्माची पुण्यप्राप्ती त्यातून होते. संजीवनी मंत्र असलेलं हे नामस्मरण माणसाचं जीवन सुखसमृद्धीकडे घेऊन जाईल असेही ज्ञानदेवांनी या अभंगातून सुचवलं आहे.

हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा |पुण्याची गणना कोण करी । (sant dnyaneshwar maharaj abhang Marathi)

अतिशय तरल शब्दांत ज्ञानदेवांनी अभंगरचना केल्या. ज्ञानदेवांचे शब्द म्हणजे, जसे ‘अमृत कण कोवळे’ इतके नाजूक आहेत. त्या शब्दांचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की, सातशे वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी त्या अभंगांची गोडी तेवढीच अवीट आहे. ते आजही सर्वांच्या मनावर राज्य करतात.

संत ज्ञानदेवांची भाषा इतकी काही मधाळ आहे, की त्या शब्दांची गोडी एकदा चाखली की, कायमच अंतःकरणात भिनत जाते. त्यांच्या मुखातून निघालेले शब्द सुगंधित होतात. त्या शब्दांचा नाद मनात रुंजी घालतो. त्यांच्या शब्दांचा स्पर्श जेव्हा कानाला होतो, तेव्हा मन आपोआप शांत होते. ज्ञानदेवांच्या शब्दांचे सौंदर्य रूप, रंग, गंध घेऊनच जन्माला येते. त्यांचे अभंगातीलच नव्हे, तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्ठी या सर्व ग्रंथांतील शब्दांना मधुरता लाभली आहे.

“चांगदेव पासष्टी” (Changdev Pasashti) या ग्रंथाद्वारे त्यांनी योगी चांगदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी त्यांना उपदेश केला आहे. त्याकाळी चांगदेव हे महान योगी समजले जात. त्यांना त्यांच्या विद्वतेचा गर्व झाला. हे ज्ञानेश्वरांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी उपदेशपर लिहिलेले 65 ओव्यांचे पत्र चांगदेवांना पाठविले. पत्रामध्ये त्यांनी अद्वैतसिद्धांताचे अप्रतिम वर्णन केले आहे.

देवदर्शनामुळे देवाच्या प्रती मनात भाव उत्पन्न होतो. देवाचा जो भाव मनामध्ये निर्माण झाला आहे, त्यातून भक्ती प्रकट होते आणि हीच भक्ती देवाला आवडते. परमेश्वरनामस्मरणामुळे मन आणि चित्त कर्मठपणापासून परमेश्वर लांब राहतो. परमेश्वराला शुद्ध भाव आवडतो. अहंकारी मनात देव कधीच वास करत नाही. सांसारिक मोहमाया माणसाला सदैव जखडून ठेवते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

आपुली आपण करा सोडवण। संसार बंधन तोडा वेगी ।। (Sant Dnyaneshwar Abhang)

प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला मोहमायेतून स्वतःलाच सोडवून घेता आले पाहिजे जेवढ्या लवकर ही गोष्ट कळेल तेवढ्या लवकर परमेश्वरप्राप्ती होऊ शकेल. संसारिक गरजा कधीच संपत नाहीत. एक संपली की दुसरी उभी राहते. सुखाच्या मागे लागलं की मनुष्य सदैव वस्तू जमा करण्यात आपला सर्व वेळ वाया घालवतो. धन कमावतो आणि या जगातून निघून जातो.

ज्ञानेश्वरांनी  शके 1212 ते शके 1218 च्या दरम्यान विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा “अमृतानुभव” हा ग्रंथ लिहिला. सुमारे 800 ओव्या या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यांच्या प्रज्ञेचा अगदी स्वतंत्र असा उत्कर्ष ‘अमृतानुभव’ हा ग्रंथ आहे. ज्यामध्ये त्यांनी योग आणि तत्वज्ञानातील आपले अनुभव सांगितले आहेत, ज्यायोगे आम्हाला अमृतचा अनुभव मिळेल.

संत ज्ञानेश्वर यांनी कर्माच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. प्रथम आपण संकल्प करतो, मग कार्य करतो आणि त्यानंतर फळ मिळते. जे कार्य आपण करतो, ते करण्यासाठी परमेश्वराने माझी नेमणूक केली आहे या भावनेतून करावे. कर्मासाठी प्रभूची मदत घेऊन जे फळ मिळेल, ते फळही त्या ईश्वरालाच अर्पण करावे.

एकदा एक साधक ज्ञानेश्वरांना विचारतात, “हे माउली काय केले असता देव लवकर प्रसन्न होईल? तो रस्ता तुम्हीच आम्हाला दाखवा.” या प्रश्नाला उत्तर देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वायां ।।

म्हणजेच काय तर, देवाच्या प्राप्तीचा मार्ग अतिशय सरळ आणि सोपा आहे तो म्हणजे नामस्मरण. परमेश्वरप्राप्तीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कुठलीही धावपळ करायची गरज नाही उगाच स्वतःला दमून घेतलं म्हणजे परमेश्वर मिळतोच असं नाही. तो आपल्या हृदयात आहे. फक्त आपण त्याच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्याला जाणून घेत नाही, म्हणून तो आपल्याला दिसत नाही.

वरील कामांशिवाय ज्ञानेश्वरांनी बनवलेल्या सुमारे 1200 अभंगांची रचना असल्याचे सांगितले गेले आहे, परंतु त्यांच्या जवळच्या तपासणीत असे दिसून आले आहे की त्या सर्व समान दर्जाच्या नाहीत. शब्दाच्या वापराच्या शैलीनुसार त्यातील कल्पना आणि तत्त्वज्ञानाने आपण असे म्हणू शकतो की यापैकी केवळ दोन ते तीनशे अभंग ही ज्ञानेश्वरांनीच रचलेली असावी आणि इतरांनी इतर लेखकांनी रचले आणि त्यास छेदलेले आहेत.

वारकरी संप्रदायासह ज्ञानेश्वरांना सर्वच भक्त प्रेमाने “माउली” (Mauli) म्हणतात. त्यांनी वाङ्मय निर्मितीचे अभूतपूर्व कार्य केले. चंद्रभागेच्या भूमीत आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.  त्यांनी वारकरी संप्रदायाचा व भागवत धर्माचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा यासमकालीन संतप्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

समाधी (Samadhi of Sant Dnyaneshwar)

‘अमृतानुभाव’ रचल्यानंतर ज्ञानेश्वर नामदेव आणि आपल्या काळातील इतर संतांसह पवित्र ठिकाणी भेट देण्यासाठी गेले. “तीर्थावली” (tirthavali) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभंगांमध्ये नामदेव यांनी त्यांच्या पवित्र स्थळांना दिलेल्या भेटीचे ग्राफिक वर्णन दिले आहे ज्यावरून आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी आपल्या काळातील अनेक पवित्र ठिकाणी भेट दिली होती.

त्यांनी पवित्र ठिकाणी भेटी पूर्ण केल्यावर ज्ञानेश्वरांना वाटले की आपल्या जीवनाचे ध्येय संपले आहे. म्हणूनच त्यांनी थेट समाधी घेण्याचा मानस व्यक्त केला. जेव्हा त्याच्या सर्व सहकार्यांना हे माहित झाले तेव्हा त्यांना ज्ञानाचा हा महासागर त्यांच्यातून सोडत असल्याबद्दल त्यांना वाईट वाटले; पण ज्ञानेश्वर आपल्या निर्णयावर ठाम होते.

शेवटी, 1296 (death of Sant Dnyaneshwar) मधील कार्तिकच्या उत्तरार्धात दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे थेट समाधी घेतली. नामदेवाने त्याच्या या अभंगात “समाधीचे अभंग” म्हणून ओळखल्या जाणार्‍या या हृदयद्रावक घटनेचा अहवाल चित्रित केला आहे. ज्ञानेश्वर निघून गेल्यानंतर त्यांच्या भावंडांनीही या जगात आपले अस्तित्व संपविण्याचे ठरविले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून एका वर्षाच्या आतच ते सर्व या नाशवंत जगाला सोडून गेले. अशा प्रकारे विठलपंतांच्या या चारही मुलांचे दुःखद जीवन संपले.

आमचा शेतकरी ब्लॉग अवश्य वाचा

तुम्हाला संत ज्ञानेश्वर माहिती Sant Dnyaneshwar Information in Marathi कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा…धन्यवाद!

Leave a Comment